अखेर तिढा सुटला, रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर उदय सामंतांकडून मोठा निर्णय

| Updated on: Apr 18, 2024 | 1:04 PM

महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून सातत्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर निवडणूक लढवण्याचा दावा केला जात होता. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण लोकसभा लढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.

Follow us on

गेल्या कित्येक दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांचा तिढा कायम होता. अशातच महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाकडून सातत्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर निवडणूक लढवण्याचा दावा केला जात होता. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नेमकं कोण लोकसभा लढणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, आज सरकारचे मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी त्यांचे बंधू आणि लोकसभा लढवण्यास इच्छूक असलेले उमेदवार किरण सामंत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उदय सामंत यांच्याकडून मोठा निर्णय जाहीर करण्यात आला. किरण सामंत माघार घेत असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केलं.

तर उदय सामंत यांनी हे जाहीर करताच दूसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून नारायण राणे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून किरण सामंत यांनी माघार घेण्याच निर्णय जाहीर केल्यानंतर उदय सामंत यांनी भविष्यात किरण सामंत खासदार होणार असल्याचे म्हटले. आम्ही काही काळ थांबणार आहोत. भविष्यात किरण सामंतच खासदार असणार आहेत. आता आम्ही सर्व नारायण राणे यांच्या पाठिशी आहोत, असं सामंत म्हणाले.