Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल

| Updated on: Jun 22, 2021 | 6:08 PM

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाबाबत राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करुन तशी माहिती दिली आहे.

Follow us on

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाबाबत राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करुन तशी माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणाबाबत शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची केलेली प्रमुख मागणी मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली,” असे संभाजी छत्रपती यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.