देशात अंमली पदार्थांचा वापर वाढत आहे, ते कसं थांबवावं माहित नाही. उच्च वर्गापासून ते खालच्या वर्गापर्यंत समाजातील सर्व स्तरात व्यसन आहे. या व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो हे आपल्याला माहित आहे. सिमेपलीकडील देश त्याला प्रोत्साहन देतात, अनियंत्रित गोष्टी वाढत आहेत. बिटकॉईन सारखी करन्सी आहे, त्यावर कोणाचं नियंत्रण आहे माहित नाही. या सर्वांवर नियंत्रण ठेवणे, ड्रग्जसारख्या व्यसनांचा पूर्ण विनाश व्हावा, हे सरकारने करावे, असं सरसंघचालक मोहन भागवत विजयादशमीनिमित्त झालेल्या भाषणात म्हणाले.