Video | भाजपचं सरकार गोव्यामध्ये बदनाम झालंय, सामनाचे अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र

| Updated on: Jan 22, 2022 | 10:37 AM

गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोव्याच्या जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे. भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची मोट  बनला आहे.

Follow us on

मुंबई : गोव्याच्या राजकारणाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. तो गोव्याच्या जनतेलाच रोखावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे सरकार गोव्यात बदनाम झाले आहे. भाजप हा इतर पक्षांतून घुसलेल्या दलाल, जमीन माफियांची मोट  बनला आहे. अर्थात, गोव्यातील भाजपमध्ये बंडाळीचे फटाके फुटत आहेत म्हणून कॉँग्रेसने ‘फेस्ट’ साजरा करण्याची गरज नाही. आज तरी गोव्याच्या राजकारणात कोणीच कीणाचा राहिलेला नाही. फक्त उत्पल पर्रीकर काय करतात तेवढेच आता पाहायचे? उत्पल जिद्दीने मैदानात उत्तरले व लढले तर भविष्यात ते गोव्याचे नेते होतील, पण त्यांची लढाई भाजपच्या बेईमानीविरुद्ध आहे हे त्यांनी विसरू नयें, अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.