Sachin Kharat | विक्रम गोखलेंवर सरकारने कायदेशीर कारवाई करावी : सचिन खरात

| Updated on: Nov 15, 2021 | 12:36 AM

भारत देश ना हिरव्याचा ना भगव्याचा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाप्रमाणे या देशाचा अशोकचक्र असलेला तिरंगा झेंडा आहे. परंतु तुमच्या सारख्या बाजार बुनग्यांना या जन्मात तरी कळणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मागणी करतो विक्रम गोखले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे ( खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी  दिलीय. 

Follow us on

मुंबई : महाराष्ट्र राज्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे. राज्यात अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून प्राणाची आहुती दिली. भारत देश ना हिरव्याचा ना भगव्याचा आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाप्रमाणे या देशाचा अशोकचक्र असलेला तिरंगा झेंडा आहे. परंतु तुमच्या सारख्या बाजार बुनग्यांना या जन्मात तरी कळणार नाही त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मागणी करतो विक्रम गोखले यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया आरपीआयचे ( खरात गट) अध्यक्ष सचिन खरात यांनी  दिलीय.