सांगली : लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अशात सर्वच पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनादेखील या निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याविषयी माहिती दिली आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले, बुलढाणासह 6 लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे. लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात येणार आहे. राज्याचे कृषीमंत्री असंवेदनशील मंत्री आहेत, असंही ते म्हणालेत.