Sanjay Raut : लोकं भारत पाकिस्तान सामना पाहणार नाही! संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut : लोकं भारत पाकिस्तान सामना पाहणार नाही! संजय राऊतांचा दावा

| Updated on: Sep 13, 2025 | 10:43 AM

संजय राऊत यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तिकिटांची विक्री कमी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, अनेक प्रखर राष्ट्रभक्त या सामन्याला पाठिंबा देणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी अलीकडेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यासंदर्भात एक वक्तव्य केले आहे. त्यांनी सांगितले की, या सामन्याच्या तिकिटांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि तिकिटे विक्रीत राहिली आहेत. राऊत यांनी या मंद प्रतिसादाला प्रखर राष्ट्रभक्तांचा विरोध कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, पेहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक हा सामना पाहण्यास उत्सुक नाहीत. त्यांनी हे देखील नमूद केले की, कदाचित काही भाजप नेते आणि त्यांचे कुटुंबीय हा सामना पाहू शकतात. पण सामान्य जनतेत या सामन्याविषयी उदासीनता आहे असे त्यांचे मत आहे.

Published on: Sep 13, 2025 10:43 AM