ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते राजकारणात शिल्लक नाही, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तत्कालिन काँग्रेस नेत्या रजनी पटेल यांचं उदाहरण दिलं. शिवसेना भवनाला त्यांना टाळा लावण्याची इच्छा होता. कालांतराने त्या राजकारणातून हद्दपार झाल्या पण शिवसेना संपली नाही. म्हणून भाजपच्या बाटग्यांनी जरा इतिहास तपासून पाहावा, अशी तोफ संजय राऊत यांनी भाजपच्या वादग्रस्त नेत्यांवर डागली आहे.