Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं… तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या पक्षांतरांवरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.
राज्यातील राजकारणात शिवसेना ठाकरे गटातून झालेल्या पक्षांतरांवरून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. माजी मंत्री सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, पक्षाची उभारणी ही शिवसैनिकांच्या मेहनतीवर होत असते. सचिन अहिर यांना पक्षाने आणि ठाकरे कुटुंबाने भरभरून संधी दिली. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीला बळ दिले, भारतीय कामगार सेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली, तसेच पुणे जिल्ह्याची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. एवढे मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या मिळूनही त्यांनी पक्ष सोडल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली.
पुढे बोलताना राऊत यांनी, सर्व काही मिळाल्यानंतरही पक्ष सोडणे हे विश्वासाला तडा देणारे असल्याचे सांगितले. त्यांनी सचिन अहिर यांच्या राजकीय प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांच्या कारकिर्दीत अनेक वळणे आणि वाद राहिल्याचा आरोप केला.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत, पक्षफोडीनंतर आनंद व्यक्त केला जात असल्याची टीका केली. तसेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांपैकी पाच जण मूळचे काँग्रेसचे असल्याचा दावाही त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.