इंदापूर : बारामतीची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. ही केवळ शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची लढाई नाही. बारामतीचं कुणी गुजरात करु पहात असेल तर शिवसेनेचा भगवा येथे ठामपणे उभा आहे. तुम्हाला लढायचे असेल तर विकासाच्या मुद्द्यावर लढा. परंतू ज्याच्या पायाखालची वाळु सरकते. आणि ज्याला पराभरावाची भीती वाटू लागतो तोच धमक्यांवर येतो अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी इंदापूरातील महाविकास आघाडीच्या शेतकऱ्यात केली. सुप्रिया सुळे यांचे भाषण वाचले, त्यात त्या म्हणाल्या की त्यांनाही भीती वाटतेय की त्यांना अटक करतील. योगेश पवार, युगेंद्र यांना अडवून सांगितले जातंय तुम्ही प्रचार करू नका. तुम्हाला लढायचे असेल तुमच्या कामावर लढा. राजकारणातला माणूस विकासावर बोलतो. देवेंद्र फडणवीस परवा म्हणाले मी पुन्हा आलो पण दोन-दोन पक्ष फोडून आलो, काय पण क्वालीफिकेशन आहे असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला.