2019 साली शिवसेना, राष्ट्रवादी अन् शिवसेना यांच्या आघाडीची बोलणी सुरू होती. याच काळात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी पहाटेचा शपथविधीची शरद पवारांची खेळी होती, असं विधान जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यावर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे होऊन गेली. आता कशाला काढायचा तो विषय काढायचा, असं शरद पवार म्हणालेत.