मुंबई: राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. राम मंदिराचा प्रश्न मोदींनी सोडवला नाही. कोर्टाने सोडवला आहे. त्यानंतर तेव्हाचे सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी खासदार करण्यात आले, असा टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला. शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक आरोपाचं प्रत्युत्तर दिलं. राम मंदिराचा प्रश्न काही मोदींनी सोडवला नाही. मोदींनी करून नाही दाखवलं. ते सर्वोच्च न्यायालयाने करून दाखवलं. त्या बदल्यात सर्वोच्च न्यायालयाचे त्यावेळ मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना खासदार केलं, असं राऊत म्हणाले.