मुंबई: “मी स्वत: 23 वर्ष आयोजक आहे. 11 हजारापासून सुरु झालेला दहीहंडीचा उत्सव कधी 21 लाखापर्यंत गेला, हे आम्हालाही कळलही नाही. त्यामुळे मतांचा जोगवा मारण्यासाठी काही करतोय असं नाहीय. 365 दिवस दहीहंडीसाठी मुल प्रयत्न करत असतात. बक्षिसाची रक्कम मिळावी. त्या बक्षिसाच्या रक्कमेतून जास्तीत जास्त समाजपयोगी काम आपल्या परिसरात करावीत, अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे आम्ही मतांच्या लाचारीसाठी असं काही करत नाहीय” असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.