मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जी- 23 नेत्यांना सुनावलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारावं अशी गळ काँग्रेस नेत्यांनी राहुल यांना घातली आहे. या मागणीमुळे आता काँग्रेसचं अध्यक्षपद राहुल गांधी यांच्याकडेच जाणार का असा प्रश्न विचारला जात आहे.