मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळं आलबेल नसल्याचा दावा विरोधकांकडून नेहमीच केला जातो. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असं भाजप नेते सर्रास म्हणतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारचे नेते आमचे सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास व्यक्त करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात एक मोठी घटना घडली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं सांगितलं जातंय. या वादामागचे नेमके कारण काय आहे ? हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट..