मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू असूनसुद्धा कोरोनाचा संसर्ग थोपवण्यास म्हणावे तेवढे यश येत नाहीये. याच कारणामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत नवे निर्बंध घालण्यात आले आहेत. जाणून घ्या राज्यात कोणकोणत्या ठिकाणी नवे कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले आहेत.