यंदाच्या वर्षीचे दहावी आणि बारावीचे वर्ग लवकरच सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनामुक्त गावांमध्ये हे वर्ग सुरु होऊ शकतात. दरम्यान वर्ग पुन्हा सुरु करण्यासाठी आवश्यक त्या सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले आहेत.