मुंबई : आज सकाळी लातूर अंबाजोगाई रोड वर ते बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण जखमी झालेत. लातूर-औरंगाबाद ही बस लातूर येथून निघाली होती. तर प्लास्टिक पाईप घेऊन जाणारा ट्रक हा आंबेजोगाई येथून लातूरकडे जात होता. बर्दापूर फाट्याच्या नजीक एका वळणावरती हा भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता की जागीच सहा जणांचा मृत्यू झालाय. इतर गंभीर जखमी झाले.