Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM

| Updated on: Nov 21, 2021 | 5:38 PM

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी झालेली घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेला घडलेली घटना त्याहूनही निंदनीय आहे. या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांचं विधान बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा पलटवार अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

Follow us on

अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी झालेली घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेला घडलेली घटना त्याहूनही निंदनीय आहे. या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत. त्यांचं विधान बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा पलटवार अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला. अमरावती हिंसेवरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर या घटनेवर मौन का? असा सवालही त्यांनी केला होता.