Supriya Sule | …म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत राष्ट्रवादीची सांगता सभा आहे. या सभेत अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. या वेळी महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आज या पोटनिवडणुकीसाठी बारामतीत राष्ट्रवादीची सांगता सभा आहे. या सभेत अनेक मोठे नेते उपस्थित आहेत. या वेळी महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. दरम्यान, त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने बारामतीकरांची मान गौरवाने उंचवली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘तामिळनाडूतील निवडणुकीबद्दल दिल्लीत चर्चा सुरू होती तेव्हा आवर्जून बारामतीचा विषय निघाला. कारण, गेल्या सहा दशकांपासून बारामतीकर आणि पवार कुटुंबामध्ये एक वेगळंच, जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं आहे. यंदा बारामतीत एक नवा विक्रम प्रस्थापित होणार आहे. या भारत देशातील एका प्रदेशात सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा मान पवारांना मिळणार आहे. खरं तर वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी माझी इच्छा होती; मात्र आता मतदान नक्कीच विक्रमी होईल’.
