मुंबई: म्हाडा परीक्षा पेपर फुटीचा संशय निर्माण झाला होता. गैरप्रकार होणार असल्याचा संशय आल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परिक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. या परीक्षा प्रकरणात पुणे सायबर सेलचा तपास सुरू असतानाच टीईटीच्या परीक्षेत देखील गैरप्रकार झाल्याचे समोर आले. सध्या या दोन्ही प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून, राज्यभरात सायबर सेलची 8 पथकं रवाना झाली आहेत. या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर येत आहेत.