नवी दिल्ली : चोरों का नाम मोदी ही क्यों होता है.. या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्या कोर्टात गुरुवारी राहुल गांधी यांच्यावरील खटल्यासंबंधी सुनावणी होणार होती. मात्र दोन दिवस आधीच सूरत कोर्टातील न्यायाधीश बदलण्यात आले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. राहुल गांधी यांच्यावरील कारवाईबाबत, त्यांच्या कोर्टातील खटल्याबाबत जेवढी तत्परता दाखवली, तेवढी तत्परता महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेनेच्या खटल्याबाबत का दाखवत नाहीत, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे. देशभरात घडणाऱ्या घटनांमुळे लोकशाही धोक्यात असून यासाठी एकजुटीने लढा द्यावा लागेल. यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत, असं वक्तव्य खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे.