मुंबई : गेली दोन वर्ष कोरोनामुळे (Ganesh Festival) गणेश उत्सव देखील घरामध्येच साजरे करण्याची नामुष्की ओढावली होती. आता परस्थिती बदलली आहे, सरकारही बदलले आहे त्यामुळे भविष्यातील सर्व उत्सव हे दणक्यात होणार असल्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. परस्थितीबरोबर सरकार बदलले असल्याने जनतेमध्येही उत्साह संचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री यांनी अनेक सार्वजनिक गणेश मंडळाला भेटी देऊन बाप्पांचे दर्शन घेतले आहे. (Ganesh Visarjan) विसर्जनाच्या दिवशी त्यांना भाजपाचे प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली असेलेल्या सार्वजनिक गणेश मंडळात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही खोचक टीका केली.