राज्यात राजकारणाचा दर्जा घसरल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात राजकारणाचा दर्जा घसरला आहे. खालच्या पातळीवर जाऊन एकोनएकांवर टीका केली जात आहे. या सर्व प्रकरणात मात्र जनतेचे प्रश्न मागे राहात असल्याचे त्यांनी म्हटले.