कोल्हापूर- ब्रिजभूषण सिंह (Brijbhushan Singh)यांचा आणि आमचा काही संबध नाही. मात्र अयोध्या दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी त्यांची भेटही घेतली. याबाबात बोलताना गजानन काळे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व पक्षाना भीती एकाच पक्षाची आहे . ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना(MNS) होय. आमच्यात मुह में राम अन बगल मे निझाम नाही, ह्यांच्याकडं मुहमें रॅम अन इकडे येऊन निझाम निझाम करायचं असे प्रकार आम्ही करत नाही. ही राज ठाकरेंची भीती आहे. त्यामुळे तिकडं गेल्यानंतर काय पद्धतीची सेटिंग झाली , काय वक्तव्य येऊ लागली . कसे त्यांच्यासोबतच फोटो येऊ लागले ,म्हणजेच हे कटकारस्थान महाराष्ट्रातून(Maharashtra) शिजले हे समोर येते हे दुदैवी आहे. हेच दक्षिणेतील नेत्याच्या बाबत झाले असते.तर तेथील सर्व नेते एकत्र येऊन यूपीच्या सरकारला ठणकावले असते. मात्र आपल्या महाराष्ट्र हे होऊ शकत नाही हे दुदैव आहे.