राज्यातील हे ईडी सरकार डिसेंबरमध्ये कोसळणार आहे. तर हे सरकार डिसेंबरपर्यंत राहणार नाही असे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर आगामी निवडणूका या नव्या चिन्हावर लढण्यास तयार राहण्याच्या सुचना केल्या आहेत. तर मराठा आरक्षणासाठी सरकार आवशक्य त्या बाबींची पुर्तता करणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हान यांनी केलेल्या गौप्यस्फा आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले अब वो जमाना गया. तर आमदार प्रताप सरकानाईक यांच्यावर दफनभूमीचा भूखंड हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याप्रकरणी मुंबई हाय कोर्टात जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G सेवेचा शुभारंभ होणार आहे. नवी दिल्लीसह देशातील चार ठिकाणी ही सेवा प्रायोजिक तत्वावर सुरू होणार आहे.