मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यांवरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde)गटाचा तोतयेगिरीचा कळस झालाय. शिंदे गटाकडून तोतयेगिरीचा कळस उभारून बंड दाखवण्याचा प्रयत्न होतोय. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व टिकवणं, वाढवणं ही आपल्याला देवाने दिलेली संधी आहे. हिंदुत्वाचा जो तोतेरी कळस निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला इतिहासामध्ये एक म्हण आहे. ‘तोतयाचे बंड’ त्याद्वारे बंड पुकारलं जातंय. असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.