INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले….
देशातील विरोधी पक्षांची INDIA आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे राजकीय लढाई लढताना दिसत आहे. मात्र, INDIA आघाडीची स्थापना होऊनही अद्याप आघाडीचा अधिकृत समन्वयक किंवा प्रमुख चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील विरोधी पक्षांची INDIA आघाडी आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी गेल्या काही वर्षांपासून एकत्रितपणे राजकीय लढाई लढताना दिसत आहे. मात्र, INDIA आघाडीची स्थापना होऊनही अद्याप आघाडीचा अधिकृत समन्वयक किंवा प्रमुख चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत झालेल्या INDIA आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण भूमिका मांडल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत INDIA आघाडीला सक्षम आणि प्रभावी समन्वयकाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. विविध पक्षांना एकत्र ठेवण्यासाठी आणि जनतेसमोर आघाडीची भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी एक मजबूत नेतृत्व आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेसमोर जाण्यापूर्वी INDIA आघाडीने पंतप्रधानपदाचा चेहराही स्पष्ट करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली. जनतेला नेतृत्वाबाबत स्पष्टता मिळावी आणि आघाडीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. INDIA आघाडीचा समन्वयक आणि संभाव्य पंतप्रधानपदाचा चेहरा याबाबत आगामी काळात कोणता निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
