मुंबई: देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील मराठा आरक्षणाचा कायदा फुलप्रुफ असता तर आज राज्यपालांची भेट घेण्याची वेळ आली नसती. आम्ही नुकतेचं राज्यपालांना पत्र दिलं आहे. त्यावर काय निर्णय येतोय ते पाहावं लागेल. राज्यपाल या विषयाशी सहमत आहेत. त्यांच्यामार्फत ते लवकरात लवकर पत्र वर देतील, आम्ही त्याबाबत आवश्यक सहकार्य त्यांना करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले.