संभाजीनगर, धाराशीव नामकरण Uddhav Thackeray यांना जमणार नाही, Nitesh Rane यांची टीका

| Updated on: Mar 21, 2022 | 4:22 PM

नितेश राणे यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण, उस्मानाबादचं धाराशीव असं नामकरण उद्धव टाकरे (Uddhav Thackeray) यांना जमणार नाही, असा दावा राणे यांनी केला आहे.

Follow us on

औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) कुणी करायचं, शिवसेना की भाजप (Shivsena Vs BJP)? हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने या प्रश्नाला चांगलीच हवा देण्यात आली आहे. सोमवारी विधानसभेत नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अत्यंत त्वेषात हा मुद्दा मांडला. छत्रपती संभाजीराजे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने शिवसेनेने आणि महाविकास आघाडी सरकारने आजच यासंदर्भातील घोषणा करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, आता नितेश राणे यांनी मविआ सरकारवर टीका केली आहे. औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण, उस्मानाबादचं धाराशीव असं नामकरण उद्धव टाकरे (Uddhav Thackeray) यांना जमणार नाही, असा दावा राणे यांनी केला आहे.