आपलीच माणसं पैसे मागतायेत मग… विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेटच सांगितलं उमेदवाराच्या माघारीचं राजकारण

आपलीच माणसं पैसे मागतायेत मग… विजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, थेटच सांगितलं उमेदवाराच्या माघारीचं राजकारण

| Updated on: Jun 06, 2026 | 12:13 PM

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी 4 जून रोजी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा विधान परिषद निवडणुकीत गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल यांनी 4 जून रोजी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत खळबळजनक विधान केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बालेकिल्ल्यातच उमेदवाराची माघार हे पक्षासाठी अनपेक्षित होतं.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले. विधान परिषदेचं राजकारण वेश्येलाही लाजवेल इतक्या खालच्या स्तरावर गेलं आहे.” त्यांनी आरोप केला की, स्वतःचे लोकही पैशांची मागणी करत आहेत आणि एवढे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर होत असल्याचाही त्यांनी दावा केला.

विशेष म्हणजे चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या भागात काँग्रेसची ताकद चांगली मानली जात होती. मित्रपक्षांच्या मदतीने काँग्रेसला विजयाची संधीही असल्याचं बोललं जात होतं.

Published on: Jun 06, 2026 12:13 PM
Follow Us