नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. मोदी आडनावावरून केलेलं वक्तव्य राहुल गांधी यांना महगात पडलं होतं. 2019 लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकच्या कोलारमध्ये एका सभेत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात, ‘सर्व चोरांचं आडनाव मोदी कसं असतं?’ असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याप्रकरणी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होतं. तसेच दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन दिला होता. अखेर सुप्रीम कोर्टाने शिक्षेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…