ओबीसींच्या आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात टोलवाटोलवीचं राजकारण सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. ओबीसींना आपली आर्थिक उन्नती साधायची असेल आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत ते मुस्लिम धर्म स्विकारत नाही तोपर्यंत धर्माल कोणताही धोका नाही. त्यामुळे माझा प्रश्न आहे की ओबसी मुस्लिम धर्म स्वीकारणार का?, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. आंबेडकरांच्या या विधानामुळे राज्यात नवं राजकीय वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.