AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उमेदवार दाम्पत्याला अपात्र ठरवण्यासाठी मृत अपत्याचीही गणना, कोर्टाचा निर्णय…

तीन अपत्यांमुळे उमेदवारी अर्ज बाद झालेल्या नंदुरबारच्या गावित दाम्पत्याला औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

उमेदवार दाम्पत्याला अपात्र ठरवण्यासाठी मृत अपत्याचीही गणना, कोर्टाचा निर्णय...
| Updated on: Nov 11, 2019 | 4:57 PM
Share

औरंगाबाद : उमेदवारी अर्ज भरताना जिवंत असलेली अपत्यच ग्राह्य धरणं आवश्यक आहे, असा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज बाद झालेल्या नंदुरबारच्या गावित दाम्पत्याला (Aurangabad Couple Candidature) मोठा दिलासा मिळाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत सुभाष गावित आणि त्यांच्या पत्नी सविता गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र तीन अपत्य असल्याचं कारण देत गावित दाम्पत्याचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात गावित दाम्पत्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवारांची जितकी अपत्यं अस्तित्वात आहेत, तितकीच अपत्यं गृहित धरता येतील, असा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. त्यामुळे याचिककर्ते सुभाष गावित आणि सविता गावित यांना दिलासा मिळाला आहे.

राणे-मुंडेंच्या वादात विलासराव मुख्यमंत्री, 1999 च्या पुनरावृत्तीची चिन्हं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना अपात्र ठरवताना मयत अपत्य किंवा जन्मतः मृत अपत्यांची गणना करु नये, असं औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट केलं.

सविता गावित यांना 2002 मध्ये झालेल्या मुलाचा 2003 मध्ये मृत्यू झाला होता. त्यांची दोनच अपत्यं हयात असल्यामुळे तेच ग्राह्य धरावं अशी याचिका दाखल (Aurangabad Couple Candidature) करण्यात आली होती.

महिलेची किती वेळा प्रसुती झाली, हे महत्त्वाचं नसून नामनिर्देशनपत्र भरताना तिची किती अपत्ये हयात आहेत, याचीच गणना व्हावी. कारण जन्मलेले अपत्य किती दिवस जगेल यावर संबंधितांचे नियंत्रण नसून, या सर्व बाबी निसर्गाच्याच अधीन आहेत, असं याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आलं. 

झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.