AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल

पोल्ट्री ब्रीडर्सच्या या भूमिकेला सर्वच शेतकरी संघटनांचा विरोध होत आहे. आता केंद्र सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

पोल्ट्री ब्रीडर्सच्या भूमिकेवरुन रणकंदन, तर चिकन आयातीची परवानगी द्या : पाशा पटेल
पाशा पटेल संग्रहीत छायाचित्र
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Nov 18, 2021 | 4:49 PM
Share

लातूर : सोयाबीनचे वाढते दर पाहताच पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनच्यावतीने हे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पशूसंवर्धन मंत्री यांना पत्र लिहले होते. मात्र, पोल्ट्री ब्रीडर्सच्या या भूमिकेला सर्वच शेतकरी संघटनांचा विरोध होत आहे. आता केंद्र सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

हंगामात मुहूर्ताचे दर वगळता सोयाबीनच्या दरात कायम घट झाली आहे. आता कुठे दिवाळीनंतर दर वाढत आहेत. दर वाढत असतानाच पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष बहादूर अली यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात सोयाबीनला प्रति क्विंटलला 2950 रुपये हमीभाव आहे. परंतु बाजारात सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये दर मिळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी सारखेच याही वर्षी पोल्ट्री उद्योगाचे नुकसान होणार आहे. सोयाबीनचे दर जास्ती जास्त चार हजार रुपये क्विंटल नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली होती.

सोयाबीनचे दर वाढले तर सोयापेंडचेही दर वाढणार

सध्या सोयाबीनच्या दरात तेजी आहे. मध्यंतरी सोयापेंडची आयात करण्यात आली होती त्या दरम्यान, सोयाबीनचे दर हे 4 हजार 500 वर स्थिर झाले होते. पण आता दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी सोयापेंडचेही दर वाढत असल्याने पोल्ट्री व्यवसाय हा अडचणीत येत आहे. त्यामुळे सोयबीनच्या दरावर केंद्र सरकारने नियंत्रण मिळवून सोयापेंडच्या आयातीची मागणी पोल्ट्री ब्रीडर्स यांनी केली आहे. त्यामुळे पोल्ट्र्री ब्रीडर्सच्या भूमिकेला शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे.

गतवर्षाीही सोयाबीन उत्पादक अडचणीत

अतिवृष्टीमुळे या वर्षी सोयाबीन उत्पादक अडचणीत आहे. आतापर्यंतही सोयाबीनला दर नव्हतेच दिवाळीनंतर दरात वाढ होऊ लागली आहे. तरीही त्या तुलनेत दर हे वाढलेले नाहीत. असे असताना पोल्ट्रीवाले सरकार दबाव आणून चार हजार रुपयापर्यंत सोयाबीनचा दर नियंत्रण करण्याचे कारस्थान करीत आहेत. गेल्या वर्षी देखील त्यांनी परदेशातून गेल्या वर्षी जीएम सोयापेंड आयात करून सोयाबीन उत्पादकांना अडचणीत आणले होते. आता तर सोयापेंडची आयात करण्यास परवानगी देण्यात आली तर आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

ज्याच्यावर भिस्त ‘ते’ खरिपातील पिकही धोक्यात, शेतकऱ्यांनो अशी घ्या काळजी

कारखानदारांचा अजब दावा, म्हणे, शेतकऱ्यांच्या काळजीपोटीच विनापरवाना पेटवली कारखान्याची धुराडी

एकदा लागवड अन् वर्षभर कमाई, खरीप-रब्बी हंगामात घेता येणारे पिक

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.