AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही परिवर्तन केले पण निसर्गालाही नाही बघवले

मराठवाडा तसा दुष्काळी भाग अशीच ओळख आतापर्यंत झालेली आहे. मात्र, प्रतिकूल परस्थितीमध्येही येथील शेतकऱ्यांनी नवनविन प्रयोग हे केलेले आहेत. मराठवाड्याच्या खडकाळ भागातील 20 हजार हेक्टरावर आंबा पिक बहरत होते. परंतू, डोंगरातील ही हिरवळ निसर्गाच्या ही पचनी पडलेली नाही.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांनीही परिवर्तन केले पण निसर्गालाही नाही बघवले
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 4:45 PM
Share

औरंगाबाद : मराठवाडा तसा दुष्काळी भाग अशीच ओळख आतापर्यंत झालेली आहे. मात्र, प्रतिकूल परस्थितीमध्येही येथील शेतकऱ्यांनी नवनविन प्रयोग हे केलेले आहेत. मराठवाड्याच्या खडकाळ भागातील 20 हजार हेक्टरावर आंबा पिक बहरत होते. परंतू, डोंगरातील ही हिरवळ निसर्गाच्या ही पचनी पडलेली नाही. आता आंबा पिक बहरात असतानाच पाऊस आणि वातावरणातील बदालामुळे मोठ्या कष्टाने बहरलेले आंबा पिकही धोक्यात आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आंबा बागा बहरलेल्या आहेत.

मोहोर लागण्यासाठी पोषक वातावरणच नाही

प्रतिकूल परस्थितीमध्येही या विभागात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. सध्या 20 हजार हेक्टरावर आंबा आहे. दरवर्षी मोहोर लागण्याच्या वेळीच वातावरणात बदल होतो आणि उत्पादकांची निराशा होते. यंदाहा सर्वकाही सुरळीच होते पण मोहोर फुटण्यासाठी 14 डिग्री तापमानात 21 दिवस सातत्य राहणे गरजेचे आहे. कल्टारचा वापर केलेल्या बागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर नैसर्गिकरीत्या डिसेंबर जानेवारीमध्ये आंब्याला मोहर येतो. यंदा ज्या ठिकाणी कल्टारचा वापर केला त्या बागांमध्ये जवळपास ७० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बागांमध्ये मोहर बाहेर पडला आहे. त्यामुळे न भरुन निघणारे नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे.

अद्यापही प्रतिकूलच वातावरण

अतिपावसामुळे आंब्याची झाडे ही सुप्ताअवस्थेत आहेत. शिवाय सततच्या पावसामुळे जमिनीत वाफसाच राहिला नाही. त्यामुळे मोहोर लागण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण अद्यापही तयार झालेले नाही. मोहोर लागण्यापूर्वी आंब्याची जमिन ही कोरडी पडणे गरजेचे असते. मुळांना हवा मिळणे गरजेचे असताना झाडाला अन्नद्रव्य ही मिळालेच नाहीत त्यामुळे मोहोर लागला नाही तर नैसर्गिक पध्दतीने लागलेला मोहोर वातावरणामुळे गळून पडला आहे.

लगडलेला मोहोर गळून पडला

ज्या आंब्याच्या झाडांना गतवर्षी कमी मोहोर होता ती झाडे यंदा लगडून गेली होती. त्यामुळे मोहोराबरोबरच आंबेही लागणार असेच चित्र होते. पण डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वातावरणातील बदल आणि अवकाळी पाऊस यामुळे 80 टक्के मोहोर गळून पडलेला आहे. त्यामुळे उत्पादनात तर घट होणारच पण हंगामही लांबणीवर जाणार असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितलेले आहे. आता उर्वरीत काळात बुरशीनाशक आणि किड नाशक फवारुनच बागा उबदार आणाव्या लागतील असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

आता सर्वकाही व्यर्थ..! 40 एक्कर मिरची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची काय झाली अवस्था..?

पावसाची उघडीप तरीही द्राक्ष बागा धोक्यातच, काय आहे शेतकऱ्यांसमोरील नवे संकट?

सोयाबीनच्या दरात चढ-उतार कायम, तुरीची आवक होण्यापूर्वीच शेतकऱ्यांमध्ये धास्ती

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.