कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकारने नारळाची एमएसपी वाढवली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर, केंद्र सरकारने नारळाची एमएसपी वाढवली!
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 4:13 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नारळाची शेती करणाऱ्या शेतकर्‍यांना केंद्र सरकारकडून एमएसपीची (Minimum Support Prices) भेट देण्यात आली आहे. (Cabinet increased the MSP for coconut farmers)

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नारळ उत्पादक शेतकर्‍यांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नारळाची एमएसपी (MSP) वाढविण्यात आली आहे. नारळाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 375 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही किंमत प्रतिक्विंटल 9 हजार 960 रुपये होती, आता ती वाढून 10 हजार 335 रुपये इतकी झाली आहे

प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही किंमत वाढवण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. जावडेकर यांनी यावेळी आरोप केला की, यूपीए सरकारने गेल्या कित्येक वर्षांमध्ये स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी केली नव्हती, परंतु मोदी सरकारने आता त्यासंबंधी पावलं उचलली आहेत.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून त्याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. पत्रकारांनी वारंवार विचारल्यानंतरही प्रकाश जावडेकर याबाबतचे प्रश्न टाळत असल्याचे यावेळी दिसून आले.

कृषी कायद्यांविरोधात सातत्याने आंदोलनं होत आहेत, तसेच नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी संपेल, असा आरोपही केला जात आहे. दरम्यान, मोदी सरकारने वारंवार आश्वासनं दिली आहेत की, एमएसपीची सुविधा पूर्वीसारखीच राहील. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या इतर विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत.

हेही वाचा

5 वर्षांत लाखो लोकांना FD पेक्षा 4 पट अधिक नफा; आता झटपट होणार पैसे दुप्पट

फेब्रुवारी 1 पासून व्यवहारातील या 5 गोष्टी बदलणार, थेट तुमच्या खिशावर होईल परिणाम

बँकेच्या खातेदारांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकेच्या ATM मधून पैसे काढता येणार नाहीत

(Cabinet increased the MSP for coconut farmers)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.