AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : भारतामध्ये मान्सूनचा असा ‘हा’ प्रवास, आगमनानंतर महिन्याभरात मिळतो दिलासा..!

भारतीय हवामान विभागाने देशात प्रमुख चार विभाग केले आहेत. यामध्ये वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असे चार विभाग आहेत. तर भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस हा 887.5 मिमी एवढा आहे. यामध्ये वायव्य भागात 615, मध्य भारक विभागाची 975.5 मिमी, पूर्व व इशान्य भागाची 1438.3 त, दक्षिण विभागाची 716.01 मिमी अशी पावसाची सरासरी आहे. दरवर्षी याच प्रमाणात पाऊस होतो असे नाही. कमी-अधिकपणा हेच मान्सूनचे वैशिष्ट आहे.

Monsoon : भारतामध्ये मान्सूनचा असा 'हा' प्रवास, आगमनानंतर महिन्याभरात मिळतो दिलासा..!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
| Updated on: May 16, 2022 | 6:05 AM
Share

मुंबई : मान्सूनवरच (Agricultural) शेती व्यवसाय अवलंबून असला तरी हा पाऊस अनियमित आणि अनिश्चित म्हणूनच ओळखला जातो. गेल्या काही वर्षापासून (Monsoon Entry) आगमन उशिराने होत असले तरी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या समस्या मिटत आहेत. मात्र, (Kharif Season) खरीप पिकांचे नुकसान हे ठरलेले आहे. देशात 20 मे पासून मान्सूनच्या आगमनाचे वेध लागतातच. 20 मे पासून चाहूल लागत असली तरी देशात सर्वत्र पोहण्यासाठी मान्सूनला 25 दिवासांचा कालावधी लागतो. दरवर्षीच्या निरिक्षणानुसार मान्सून आगमनाच्या तारखा ह्या ठरलेल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे. पण यंदा भारतीय हवामान विभाग आणि’स्कायमेट’ वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. वेळेत पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांचे नुकासान तर टळतेच पण खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो.

भारतामध्ये मान्सूनचा असा प्रवास

सर्वप्रथम 20 मे च्या सुमारास अंदमान -निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत 1 जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो 5 जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो.नंतर 10जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा,पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. दरवर्षी वेळेवरच मान्सून दाखल होईल असे नाही तर कधी-कधी 5 ते 6 दिवसांनी तो उशिराही दाखल होतो.

देशातील 4 प्रमुख विभागात मान्सूनचे वर्गीकरण

भारतीय हवामान विभागाने देशात प्रमुख चार विभाग केले आहेत. यामध्ये वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असे चार विभाग आहेत. तर भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस हा 887.5 मिमी एवढा आहे. यामध्ये वायव्य भागात 615, मध्य भारक विभागाची 975.5 मिमी, पूर्व व इशान्य भागाची 1438.3 त, दक्षिण विभागाची 716.01 मिमी अशी पावसाची सरासरी आहे. दरवर्षी याच प्रमाणात पाऊस होतो असे नाही. कमी-अधिकपणा हेच मान्सूनचे वैशिष्ट आहे.

पावसामध्ये अनियमतिता, परतीच्या पावसाने दिलासा

मान्सूनच्या पावसावर केवळ भारतीय शेतीच नाही तर अशिया खंडातील जवळपास सर्वच देश याच पावसावर अवलंबून आहेत. मान्सूनवर सर्वकाही अवलंबून असले तरी हाच मान्सून अनियमित आणि अनिश्चित असा आहे. आतापर्यंत मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे देशात मान्सूनचा प्रवास कसा राहणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.