AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : भारतामध्ये मान्सूनचा असा ‘हा’ प्रवास, आगमनानंतर महिन्याभरात मिळतो दिलासा..!

भारतीय हवामान विभागाने देशात प्रमुख चार विभाग केले आहेत. यामध्ये वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असे चार विभाग आहेत. तर भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस हा 887.5 मिमी एवढा आहे. यामध्ये वायव्य भागात 615, मध्य भारक विभागाची 975.5 मिमी, पूर्व व इशान्य भागाची 1438.3 त, दक्षिण विभागाची 716.01 मिमी अशी पावसाची सरासरी आहे. दरवर्षी याच प्रमाणात पाऊस होतो असे नाही. कमी-अधिकपणा हेच मान्सूनचे वैशिष्ट आहे.

Monsoon : भारतामध्ये मान्सूनचा असा 'हा' प्रवास, आगमनानंतर महिन्याभरात मिळतो दिलासा..!
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
| Updated on: May 16, 2022 | 6:05 AM
Share

मुंबई : मान्सूनवरच (Agricultural) शेती व्यवसाय अवलंबून असला तरी हा पाऊस अनियमित आणि अनिश्चित म्हणूनच ओळखला जातो. गेल्या काही वर्षापासून (Monsoon Entry) आगमन उशिराने होत असले तरी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या समस्या मिटत आहेत. मात्र, (Kharif Season) खरीप पिकांचे नुकसान हे ठरलेले आहे. देशात 20 मे पासून मान्सूनच्या आगमनाचे वेध लागतातच. 20 मे पासून चाहूल लागत असली तरी देशात सर्वत्र पोहण्यासाठी मान्सूनला 25 दिवासांचा कालावधी लागतो. दरवर्षीच्या निरिक्षणानुसार मान्सून आगमनाच्या तारखा ह्या ठरलेल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून मान्सूनचे आगमन उशिराने झाले आहे. पण यंदा भारतीय हवामान विभाग आणि’स्कायमेट’ वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले आहे. वेळेत पावसाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांचे नुकासान तर टळतेच पण खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो.

भारतामध्ये मान्सूनचा असा प्रवास

सर्वप्रथम 20 मे च्या सुमारास अंदमान -निकोबार बेटांवर दाखल होतो. तेथून मान्सून बंगालच्या उपसागरातून प्रवास करत 1 जूनच्या आसपास केरळात दाखल होतो. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पुढे सरकत तो 5 जून पर्यंत कर्नाटक, तामीळनाडू, आंध्र प्रदेश, आसाम व ईशान्येकडील राज्यांत दाखल होतो.नंतर 10जूनला महाराष्ट्र, छत्तीसगड, प. बंगाल, बिहार राज्यात दाखल होतो. त्यानंतर मान्सून 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, हिमाचल प्रदेश,राजस्थान व उत्तर प्रदेशचा काही भागात प्रवेश करतो. एक जुलैला उर्वरित राजस्थान व उत्तर प्रदेशसह हरियाणा,पंजाब,जम्मू-काश्मीरसह मान्सून दाखल होतो. दरवर्षी वेळेवरच मान्सून दाखल होईल असे नाही तर कधी-कधी 5 ते 6 दिवसांनी तो उशिराही दाखल होतो.

देशातील 4 प्रमुख विभागात मान्सूनचे वर्गीकरण

भारतीय हवामान विभागाने देशात प्रमुख चार विभाग केले आहेत. यामध्ये वायव्य भारत, मध्य भारत, पूर्व भारत आणि दक्षिण भारत असे चार विभाग आहेत. तर भारतामध्ये सर्वसाधारण पाऊस हा 887.5 मिमी एवढा आहे. यामध्ये वायव्य भागात 615, मध्य भारक विभागाची 975.5 मिमी, पूर्व व इशान्य भागाची 1438.3 त, दक्षिण विभागाची 716.01 मिमी अशी पावसाची सरासरी आहे. दरवर्षी याच प्रमाणात पाऊस होतो असे नाही. कमी-अधिकपणा हेच मान्सूनचे वैशिष्ट आहे.

पावसामध्ये अनियमतिता, परतीच्या पावसाने दिलासा

मान्सूनच्या पावसावर केवळ भारतीय शेतीच नाही तर अशिया खंडातील जवळपास सर्वच देश याच पावसावर अवलंबून आहेत. मान्सूनवर सर्वकाही अवलंबून असले तरी हाच मान्सून अनियमित आणि अनिश्चित असा आहे. आतापर्यंत मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावलेले आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलासा मिळालेला आहे. त्यामुळे देशात मान्सूनचा प्रवास कसा राहणार यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.