AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane : ऊस गाळपाला लागले मुहूर्त, आता एक रकमी ‘एफआरपी’साठी लढा

मविआ सरकारने शेतकऱ्यांचे नाहीतर साखर कारखानदारांचे हित जोपासण्यावर भर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Sugarcane : ऊस गाळपाला लागले मुहूर्त, आता एक रकमी 'एफआरपी'साठी लढा
शेतकरी नेते सदाभाऊ खोत
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 19, 2022 | 6:00 PM
Share

मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा देणारे  सदाभाऊ खोत ((Sadabhau Khot)) हे सरकारला कस काय जाब विचारणार? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण हा प्रश्न काही मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे आहे तर शेतकऱ्यांप्रति आपली ही भूमिका राहणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात एकरकमी एफआरपी (FRP Amount) देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने साखर कारखान्यांचे हित जोपासत दोन टप्पे पाडले होते. आता शिंदे सरकारकडेही एक रकमी एफआरपी देण्यासंदर्भात मागणी केली जाणार आहे. शिवाय यंदाही यावर निर्णय झाला नाहीतर शिंदे सरकारलाही जाब विचारला जाणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

राजकारण काही का असेना पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज हा उठविलाच जाणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले आहे. एक रकमी एफआरपी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे साखर कारखानदारांपेक्षा शेतकऱ्यांचा विचार होणे गरजेचे असल्याचे खोत यांनी म्हटले आहे.

गतवर्षीच्या हंगामात महाविकास आघाडी सरकारची सत्ता होती. त्या दरम्यान, एक रकमी एफआरपीचे अधिकार हे राज्य सरकारला देण्यात आले होते. पण मविआ सरकारने शेतकऱ्यांचे नाहीतर साखर कारखानदारांचे हित जोपासण्यावर भर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

वेदांता प्रोजेक्ट हा गुजरातला गेल्याने विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. पण याच गुजरातमध्ये ऊसाला 4 हजार 500 रुपये टन असा दर आहे. या दराबाबत तुलना करणे गरजेचे आहे. राज्यात असे दर मिळावेत यासाठी विरोधकांनी भूमिका घ्यावी असा सल्ला खोत यांनी दिला आहे.

मंत्रिमंडळात सदाभाऊ खोत यांची वर्णी लागली नाही, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता. याबाबत मुख्यमंत्री हेच निर्णय घेतील, शिवाय त्याबाबत अधिकचे बोलणार नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा दुसरा टप्प्यातील विस्तार केव्हा हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत