AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sugarcane : ऊस गाळपाला लागले मुहूर्त, आता एक रकमी ‘एफआरपी’साठी लढा

मविआ सरकारने शेतकऱ्यांचे नाहीतर साखर कारखानदारांचे हित जोपासण्यावर भर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

Sugarcane : ऊस गाळपाला लागले मुहूर्त, आता एक रकमी 'एफआरपी'साठी लढा
शेतकरी नेते सदाभाऊ खोत
| Edited By: | Updated on: Sep 19, 2022 | 6:00 PM
Share

मुंबई : शिंदे सरकारला पाठिंबा देणारे  सदाभाऊ खोत ((Sadabhau Khot)) हे सरकारला कस काय जाब विचारणार? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पण हा प्रश्न काही मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे आहे तर शेतकऱ्यांप्रति आपली ही भूमिका राहणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) काळात एकरकमी एफआरपी (FRP Amount) देण्याची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारने साखर कारखान्यांचे हित जोपासत दोन टप्पे पाडले होते. आता शिंदे सरकारकडेही एक रकमी एफआरपी देण्यासंदर्भात मागणी केली जाणार आहे. शिवाय यंदाही यावर निर्णय झाला नाहीतर शिंदे सरकारलाही जाब विचारला जाणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.

राजकारण काही का असेना पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज हा उठविलाच जाणार असल्याचे खोत यांनी स्पष्ट केले आहे. एक रकमी एफआरपी न मिळाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे साखर कारखानदारांपेक्षा शेतकऱ्यांचा विचार होणे गरजेचे असल्याचे खोत यांनी म्हटले आहे.

गतवर्षीच्या हंगामात महाविकास आघाडी सरकारची सत्ता होती. त्या दरम्यान, एक रकमी एफआरपीचे अधिकार हे राज्य सरकारला देण्यात आले होते. पण मविआ सरकारने शेतकऱ्यांचे नाहीतर साखर कारखानदारांचे हित जोपासण्यावर भर दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

वेदांता प्रोजेक्ट हा गुजरातला गेल्याने विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे. पण याच गुजरातमध्ये ऊसाला 4 हजार 500 रुपये टन असा दर आहे. या दराबाबत तुलना करणे गरजेचे आहे. राज्यात असे दर मिळावेत यासाठी विरोधकांनी भूमिका घ्यावी असा सल्ला खोत यांनी दिला आहे.

मंत्रिमंडळात सदाभाऊ खोत यांची वर्णी लागली नाही, त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आता मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार असा प्रश्न त्यांना करण्यात आला होता. याबाबत मुख्यमंत्री हेच निर्णय घेतील, शिवाय त्याबाबत अधिकचे बोलणार नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे मंत्रिमंडळाचा दुसरा टप्प्यातील विस्तार केव्हा हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.