AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cotton Export: कापसाचे दर वाढले पण निर्यात घटली, हे सर्व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे घडले

बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. खानदेशात केळीच्या बरोबरीने कापसाचे पीक घेतले जाते. एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 5 लाख 50 हजार हेक्टरावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, त्याच तुलनेत बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकासनही होत आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

Cotton Export: कापसाचे दर वाढले पण निर्यात घटली, हे सर्व बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे घडले
कापूस पीक
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: May 09, 2022 | 11:05 AM
Share

जळगाव : कापूस हे (Kharif Season) खरिपातील हुकमी पीक होते मात्र, बोंडअळीमुळे कापसाच्या क्षेत्रातच नव्हे तर गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. गतवर्षा निसर्गाचा लहरीपणा आणि अंतिम टप्प्यात (Outbreak of bondage) बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती. याचाच परिणाम म्हणून  (Cotton Rate) कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी जागतिक बाजारपेठेतील निर्यातदारांची पसंती असलेल्या खानदेशातील ‘महाकॉट’ या ब्रॅंण्डला यंदा अमेरिकन बोंडअळीने डंक माराला की काय अशी अवस्था झाली आहे. कापसाचे उत्पादन तर घटलेच पण गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच मराठवाडा आणि विदर्भातील कापसाची निर्यात झाली आहे. खानदेशातील कापूस निर्यातीमध्ये 80 टक्के घट झाली तर आतापर्यंत केवळ 2 लाख गाठींची निर्यात होऊ शकली आहे. त्यामुळे तब्बल 1 हजार कोटी घरात याचा परिणाम होणार आहे.

बोंडअळीच कापसावरील सर्वात मोठे संकट

बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटले आहे. खानदेशात केळीच्या बरोबरीने कापसाचे पीक घेतले जाते. एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल 5 लाख 50 हजार हेक्टरावर कापसाची लागवड केली जाते. मात्र, त्याच तुलनेत बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकासनही होत आहे. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांनी एकात्मिक व्यवस्थापन करावे म्हणून कापूस लागवडीसाठी 1 जूननंतरची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

स्थानिक बाजारपेठेतही उठाव नाही

निसर्गाचा लहरीपणा आणि प्रमाणापेक्षा अधिकचा पाऊस यामुळे कापसाचे उत्पादन तर घटणारच होते पण अंतिम टप्प्यात पुन्हा बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला होता. अशा प्रतिकूल परस्थितीमुळे उत्पादनात तर घट झालीच पण कापसाचा दर्जाही सुधारला नाही.बोंडअळीमुळे गुणवत्ता खराब झाल्याने निर्यातदारांनी खरेदी केलीच नाही तर स्थानिक बाजारपेठेतही दर्जाहीन कापसाला शेवटपर्यंत मागणीच झाली नाही. त्यामुळे उच्चांकी भाव मिळूनही शेतकऱ्यांना थेट फायदा झालेला नाही.

लांबलेल्या हंगामाचा परिणाम

अधिकच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी मुख्य पिकांतून तर उत्पादन घेतलेच पण पुन्हा फरदडमधून उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. फरदड उत्पादन म्हणजे कापसाचा कालावधी संपूनही त्याला पाणी देऊन उत्पादन सुरुच ठेवणे. यामुळे थोड्याबहुत प्रमाणात उत्पन्न मिळाले असले तरी याच काळात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. शिवाय फरदडचे उत्पादन न घेतल्यास बोंडअळीमध्ये खंड पडतो. पण फरदडमुळे हा खंडच पडला नाही. परिणामी बोंडअळीचा प्रादुर्भाव हा वाढतच गेल्याने उत्पादनात घट तर झालीच शिवाय कापसाच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....