AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरांच्या किमती वाढल्या; जाणून घ्या का वाढतायेत घरांचे दर?

घर बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती 1 वर्षापासून महागल्या आहेत. सिमेंट, लोखंड, स्टील, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमसह प्रत्येक वस्तूंचे भाव वाढले आहेत . वर्षभरात सिमेंटच्या किमती 22 टक्के, स्टील 30 टक्के, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमच्या दरात उच्चांकी अशी वाढ झालीये.

घरांच्या किमती वाढल्या; जाणून घ्या का वाढतायेत घरांचे दर?
घर खरेदी करणे होणार महाग
| Updated on: Apr 06, 2022 | 5:30 AM
Share

नाशिक (Nashik) येथे राहणाऱ्या कृष्णानं घर घ्यायचं ठरवलं. बँकेत लोनची प्रक्रिया पूर्ण करून डाऊन पेमेंटची (Down payment) कसरतही पूर्ण केली. एवढे सर्व करून देखील त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. एकीकडे बिल्डरनं (Builder) सूट तर दिलीच नाही, याऊलट घरांच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे कर्जही महाग होणार आहे. त्यामुळे कृष्णानं घर खरेदीचा निर्णय काही दिवस स्थगित केलाय. पण या घरांच्या किंमती का वाढत आहेत हे समजून घेऊया. घर बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती 1 वर्षापासून महागल्या आहेत. सिमेंट, लोखंड, स्टील, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमसह प्रत्येक वस्तूंचे भाव वाढले आहेत . वर्षभरात सिमेंटच्या किमती 22 टक्के, स्टील 30 टक्के, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमच्या दरात उच्चांकी अशी वाढ झालीये. तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे वाहतूक खर्च देखील वाढलाय. कामगारांची मजुरी देखील वाढलेली आपल्याला दिसून येते.

घराच्या खर्चाचे वर्गीकरण

बांधकामाच्या एकूण खर्चात 67 टक्के कच्चा माल , मजुरी 28 टक्के आणि इंधनाचा खर्च 5 टक्के याचा समावेश असतो, असं रिअल इस्टेट कंपनी कॉलिरसच्या एका अहवालातून माहिती समोर आली आहे. बांधकामाला लागणारा सर्वच कच्चा माल महाग झालाय. वर्षभरात बांधकामाच्या खर्चात जवळपास 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गृहनिर्माण बांधकामाचा खर्च 2060 रुपये प्रती चौरस फूट होता, तो आता 2300 रुपये झाला आहे. दुसरीकडे औद्योगिक बांधकामाचा खर्च देखील वाढला आहे. कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली होती. आता संपूर्ण निर्बंध उठवल्यानंतरही बांधकाम क्षेत्रात मागणी वाढली नाही. तरीही बिल्डरांनी घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. तसेच देशातील प्रमुख 8 शहरांमध्ये जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत घरांच्या विक्रीत दरवर्षी 7 टक्के वाढ झाली आहे. याच कालाववधीत घरांच्या किंमतीतही सरासरी 7 टक्क्यांनी वाढ झालीये, असे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म प्रॉपटायगरनं अहवालात माहिती दिलीये.

कच्च्या मालाच्या किमती आणखी वाढणार

सिमेंट, लोखंड, आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत आणखीन वाढ होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यापुढेही घरांच्या किंमती अजून वाढू शकतात, असं कॉलिरसचे सीइओ रमेश नायर सांगतात . यासोबतच डिसेंबरपर्यंत घर बांधकामाचा खर्च 8 ते 9 टक्क्यानं वाढण्याचा अंदाजही नायर यांनी वर्तवलाय. त्यामुळे आता एकूणच सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार होणाऱ्या परवडणाऱ्या घराचं स्वप्न महाग होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

सर्व जगातच इंधनाचे दर वाढले, अमेरिकेत पेट्रोलच्या भावात 55 टक्क्यांची वाढ; इंधन दरवाढीवर सरकारचे स्पष्टीकरण

Semiconductor crisis: सेमीकंडक्टरचा तुटवडा वाहन उद्योगाच्या मुळावर, वाहन विक्रीत मोठी घट

IIT Kanpur : बापरे बाप! शंभर कोटींची गुरुदक्षिणा, कोण आहे देणगी देणारा कोट्यधीश विद्यार्थ्यी?

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.