Income Tax Return | 3 वर्षात पहिल्यांदाच कर परताव्याची मुदत वाढवण्यास केंद्राचा नकार, काय आहेत कारणे जाणून घ्या

Income Tax Return News | प्राप्तीकर रिटर्न (ITR)भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 रोजी आहे. ही मुदत वाढवण्यास सरकार उत्सुक नाही. काय आहेत यामागची कारणे, जाणून घेऊयात

Income Tax Return | 3 वर्षात पहिल्यांदाच कर परताव्याची मुदत वाढवण्यास केंद्राचा नकार, काय आहेत कारणे जाणून घ्या
प्राप्तीकर रिटर्न भरला का?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 26, 2022 | 11:39 AM

Income Tax Return | प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 रोजी संपत आहे हे एव्हाना ऐकून तुमचं डोकं भनभनलं असेल. इतक्या दिवसांपासून याच बातम्या समोर येत आहेत. या बातम्या अर्थातच तुमच्या भल्यासाठीच देण्यात आल्यात. या बातम्यांनी तुमचं होणारं नुकसान टळलं. पण नेहमीसारखं सरकार अंतिम तारीख (Last Date) वाढवतं हा अतिआत्मविश्वास काही जणांना नडला. त्यांना त्याचा फटका बसणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. गेल्या दोन आर्थिक वर्षांत, कोविड -19 (Covid-19) साथीच्या रोगाशी लढा देत असलेल्या करदात्यांना सरकारने दिलासा दिला होता. सरकारने आयटीआर (ITR)दाखल करण्याची अंतिम मुदत वाढविली होती. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. यावेळी कुठलेही मानवी संकट आलेले नाही. त्यामुळे केंद्र सरकार आयटीआरची मुदत वाढविण्याच्या विचारात नाही. त्यामुळे फाजील आत्मविश्वासाला सोडा आणि मुदतीच्या आत आयकर रिटर्न भरा. त्यानंतर तुम्हाला दंडासहित इतर कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

काय म्हणाले महसूल सचिव

प्राप्तीकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 रोजी संपत आहे. पण गेल्या काही वर्षात सरकारने अंतिम मुदत वाढवली होती. त्यावेळी कारणं वेगळी होती. त्यावेळी जागतिक मानवी संकट ओढावले होते. यंदा मात्र कोणतेही मोठे कारण नाही. त्यामुळे सरकार प्राप्तीकर रिटर्न दाखल करण्यासाठी अंतिम तारखेत मुदत वाढ देण्याच्या विचारात नसल्याचे महसूल सचिव तरुण बजाज यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

हे 5 ठळक मुद्दे ही घ्या लक्षात

प्राप्तीकर खात्याच्या (ITD) नियमांनुसार, वैयक्तिक करदात्यांनी – ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसते. त्यांना आर्थिक वर्षाचा आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत पुढील आर्थिक वर्षाच्या 31 जुलै पर्यंत आहे.

आता कराचा भरणा सोपे झाले आहे आणि परतावा ही गतीने मिळत आहे. प्राप्ती कर खात्याने कर भरणा करणे सोपे व्हावे यासाठी नवीन आय-टी फायलिंग पोर्टल सुरु केले आहे. त्यामुळे वाढीव भार टळला आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी करदात्यांचा अभिप्राय चांगला असल्याचे सांगितले.

गेल्या वेळी, प्राप्तीकर खात्याकडे 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कराचा (शेवटच्या तारखेला रिटर्न भरणे) भरणा केला होते. यंदा शेवटच्या तारखेला 1 कोटी करदात्यांसाठी आमची तयारी झाली आहे. त्यामुळे यंदा लोकांना अडचण येणार नाही असे बजाज यांनी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 (Fiscal Year 2021) मध्ये 31 डिसेंबर 2021 च्या वाढीव देय तारखेपर्यंत सुमारे 5.89 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते. आयटीआरच्या माध्यमातून एखादी व्यक्ती भारताच्या आयकर विभागाकडे सादर करायची असते. त्यात त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि त्यावर विशिष्ट आर्थिक वर्षात भराव्या लागणाऱ्या करांची माहिती देण्यात येते.

जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न सूट दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर त्याने कर परतावा भरणे आवश्यक आहे. नव्या करप्रणालीनुसार सवलतीची मर्यादा अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वीच्या नियमानुसार 60 वर्षांखालील व्यक्तींना अडीच लाख रुपये सूट मर्यादा आहे. 60 ते 80 वयोगटातील (Senior Citizen)साठी 3 लाख रुपये आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या (Super Senior Citizen) साठी 5 लाख रुपयांची सूट मर्यादा आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.