AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 रुपयांचा वाद… पेटला आणि त्याने जीव गमावला, मित्रच ठरला काळ !

मुंबई शहरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून छोट्या-मोठ्या कारणासाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायलाही पुढेमागे बघत नाहीत. गेल्या आठवड्यात दर स्टेशनवर एका सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. मूकबधिर मित्रांनीच त्यांच्या एका मित्राचा खून केला होता. आता मुंबईत तशीच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 30 रुपयांसाठी एका इसमाला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला

30 रुपयांचा वाद... पेटला आणि त्याने जीव गमावला, मित्रच ठरला काळ !
| Updated on: Aug 13, 2024 | 11:44 AM
Share

मुंबई शहरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढलं असून छोट्या-मोठ्या कारणासाठी लोक एकमेकांचा जीव घ्यायलाही पुढेमागे बघत नाहीत. गेल्या आठवड्यात दर स्टेशनवर एका सूटकेसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ माजली होती. मूकबधिर मित्रांनीच त्यांच्या एका मित्राचा खून केला होता. आता मुंबईत तशीच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 30 रुपयांसाठी एका इसमाला त्याचा अमूल्य जीव गमवावा लागला आहे. हो , हे खरं आहे. रिक्षाचं भाडं देण्यावरून मित्रांमध्ये वाद झाला आणि एक मित्रच दुसऱ्या मित्राच्या जीवावर उठला. त्याने मित्राला जबर मारहाण केली आणि त्याला तसाच जखमी अवस्थेत मरायला टाकून तो पळून गेला. पहाटेच्या सुमारास इतर लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या जखमी इसमाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं खरं, पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होती. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.

चक्कन अली असे मृत समाचे नाव असून तो 29 वर्षांचा आहे. तर सैफ जहिद अली असे मारेकरी आरोपीचे नाव असून मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला कल्याण रेल्वे स्टेशनमधून अटक केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

रिक्षाचं भाडं देण्यावरून झालेला वाद जीवावर बेतला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे कुर्ला येथील पॅलेस रेसिडन्सी बार बाहेर एका इसमाचा मृतदेह सापडला होता. चक्कन अअली असे त्याचे नाव होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, संशयाची सुई त्याचा मित्र सैफ याच्याकडे वळली. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत होते. तो तडकाफडकी उत्तर प्रदेशातील त्याच्या गोंडा या गावी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर मुंबई गुन्हे शाकेच्या कक्ष 5 च्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या सैफ याला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली.

चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला. आरोपी सैफ आणि मृत इसम चक्कन (वय 29) हे दोघेही मित्र होते. रविवारी रात्री ते धारावीतून कुर्ल्याला रिक्षाने आले. रिक्षाचं भाडं 30 रुपये झालं. मात्र ते पैसे कोणी द्यायचे यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता तो वाद खूप वाढला आणि टोकाला गेला. त्याच भांडणादरम्यान रागाच्या भरात सैफने चक्कनला मारहाण केली, तो गंभीर जखमी झाला. मात्र त्याला तशाच अवस्थेत टाकून सैफ तिथून पसार झाला. पहाटेच्या सुमारास काही लोकांनी त्याला जखमी अवस्थे पाहिलं आणि उपचारांसाठी रुग्णालयात नेलं पण तेथे डॉक्टरांन तपासून त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी आरोपी सैफविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आस्ून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली