AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये रोंद नदीत तीन जण वाहून गेले, दोन बहिणींसह एका तरुणाचा समावेश

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने, रोंद नदीला पूर आला आहे. याच पुरामध्ये तीन जण वाहून गेल्याची घटना समोर आलीय.

बीडमध्ये रोंद नदीत तीन जण वाहून गेले, दोन बहिणींसह एका तरुणाचा समावेश
रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर मच्छिमार बोट बुडालीImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Oct 20, 2022 | 9:06 PM
Share

बीड : परतीच्या पावसाने राज्याला चांगलेच झोडपून काढले आहे. पावसामुळे शेतीचे नुकसान झालेच आहे, मात्र जनजीवनही विस्कळीत झाले आहे. नद्यांना पूर आला आहे. यामुळे पूल, रस्ते वाहून गेले आहेत. सर्वत्र पूरस्थिती (Flood) निर्माण झाली असून, या पुराच्या पाण्यामुळे जीवितहानीच्या घटनाही घडत आहेत. बीड जिल्ह्यातही (Beed district) अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसामुळे नदीच्या प्रवाहात वाढ होऊन या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची (Three drowned in river) दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने, रोंद नदीला पूर आला आहे. याच पुरामध्ये तीन जण वाहून गेल्याची घटना समोर आलीय. शिरूर तालुक्यातील भानकवाडी येथील ही घटना असून यात दोन मुलींसह एका तरुणाचा समावेश आहे.

मुलींचे मृतदेह सापडले, तरुण अद्याप बेपत्ता

दरम्यान शोध कार्यानंतर दोन लहान मुलींचा मृतदेह सापडला आहे, तर 30 वर्षीय तरुण अद्याप बेपत्ता आहे. मयत मुली या सख्ख्या मबिहणी आहेत. तर 30 वर्षीय साईनाथ भोसले हा तरुण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले आहे.

नदीच्या पाण्यातून घराकडे चालल्या होत्या मुली

भनकवाडी येथे रोंद नदीवर पूल नाही. यामुळे भनकवाडी येथील गावकऱ्यांना नदीच्या पाण्यातूनच ये-जा करावी लागते. मयत दोघी बहिणीही शेतावर गेल्या होत्या. शेतातून नदीच्या पाण्यातून त्या आपल्या वस्तीकडे चालल्या होत्या. मात्र नदीतून जात असतानाच अचानक पाण्याचा लोंढा आला आणि मुली वाहून जाऊन लागल्या.

मुलींना वाचवण्यासाठी तरुणाने पाण्यात उडी घेतली

यावेळी तेथे उपस्थित साईनाथ भोसले या तरुणाने मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरले. दोघी बहिणींचा मृ्त्यू झाला तर साईनाथ अद्याप बेपत्ता आहे. यावेळी नदीच्या आसपास असलेले इतर ग्रामस्थही गोळा झाले मात्र पाण्याचा प्रवाह इतका होता की, वाचवू शकले नाही.

ग्रामस्थांकडून वारंवार नदीवर पूल बांधून देण्याची मागणी होत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत आहेत.

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.