AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहरी भागातील शाळा सुरु करा, बालविवाहाचा धोका वाढतोय, शिक्षकांचं औरंगाबादेत आंदोलन

राज्यातील शहरी भागातील शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पुरोगामी शिक्षक आणि शिक्षेकत्तर संघटनांनी औरंगाबाद येथील क्रांती चौकात आंदोलन केले. यावेळी प्रत्यक्ष नाट्य सादर करून विद्यार्थी आणि शिक्षकांचे काय नुकसान होतेय हे दाखवण्याचा प्रयत्न केला.

शहरी भागातील शाळा सुरु करा, बालविवाहाचा धोका वाढतोय, शिक्षकांचं औरंगाबादेत आंदोलन
प्रतिकात्मक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 18, 2021 | 12:01 PM
Share

औरंगाबाद: राज्यातील शहरी भागातील शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी पुरोगामी शिक्षक आणि शिक्षेकत्तर संघटनांनी औरंगाबाद येथील क्रांती चौकात आंदोलन केले. यावेळी प्रत्यक्ष नाट्य सादर करून विद्यार्थी आणि शिक्षकांचे काय नुकसान होतेय हे दाखवण्याचा प्रयत्न केला. शालेय शिक्षण विभागानं शाळा सुरु करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. मात्र, कोरोनाचं कारण देतं त्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी शाळा सुरु करण्यासाठी आंदोलन केलं आहे.

शाळा बंद असल्यानं बाल विवाहाचा धोका

भावी पिढी सक्षम व्हावी आणि शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत व्हावी, यासाठी शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली.शाळा बंद असल्याने बाल विवाह होत असून हे थांबवा अशी मागणी ही करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती

शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली होती. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं 10 ऑगस्टला कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

लसीकरण झालं नसल्यानं रिस्क नको

“टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. रिस्क घेऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळे याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

इतर बातम्या:

गाडीतून ऑईल गळती, लहान मुलाने गंडवलं, बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने 50 लाखांची लूट टळली

Bank Holidays in August 2021 : उद्यापासून 5 दिवस बँका बंद, आजच महत्त्वाची कामं उरका, बँकेत जाण्यापूर्वी ही यादी नक्की पाहा

Maharashtra School Reopen teachers protest at Aurangabad for school reopen in urban areas

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.