AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election Result 2026: उद्धव ठाकरेंच्या त्या एका खेळीने एकनाथ शिंदेंना मोठा फटका! मुंबईत सरस

BMC Election Result 2026: आज राज्यातील महानगरापालिका निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत समोर आलेले आकडे पाहून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेंना पछाडलं आहे.

BMC Election Result 2026: उद्धव ठाकरेंच्या त्या एका खेळीने एकनाथ शिंदेंना मोठा फटका! मुंबईत सरस
Eknath ShindeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 16, 2026 | 11:36 AM
Share

राज्यातील सर्वात बहुप्रतिक्षित महानगरपालिका निवडणुकीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पाडली. राज्यातील जवळपास 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. आज, 16 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून निकालाचे अपडेट समोर येत आहेत. आतापर्यंत समोर आलेले आकडे पाहाता मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या निकालात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदें शिवसेनेला पछाडलं असल्याचे चित्र दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी उचललेले एक पाऊस त्यांच्यासाठी फायद्याचे ठरले आहे.

ती खेळी कोणती?

एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक आपल्या बाजूने केले होते. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला कमकुवत करण्याचा त्यांच्या प्रयत्न होता. मात्र, मुंबईतील आपली सत्ता कमकुवत होताना पाहून उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी केली. त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी हात मिळवणी केली. ठाकरे बंधूंच्या या यूतीचा उद्धव ठाकरे यांना मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे आकडेवारी?

आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांवरुन उद्धव ठाकरे यांची शिवसेना सरस ठरत असल्याचे चित्र आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची 51 जागांवर आघाडी दिसत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची 20 जागांवर आघाडी आल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच मुंबईत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पछाडलं असल्याचे समोर आले आहे. तर मनसेच्या 7 जागांवर आघाडी असल्याचे चित्र आहे.

आतापर्यंतचा निकाल काय?

मुंबईची आकडेवारी

भाजप- 57

शिवसेना- 20

शिवसेना UBT : 58

काँग्रेस : 09

मनसे- 7

राष्ट्रवादी-01

इतर-05

भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट एकत्रितपणे 83 जागांवर आघाडीवर आहेत. यामुळे मुंबईतील स्थानिक राजकारणात महायुतीची ताकद स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट) 60 जागांवर आघाडीवर असून, महायुतीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. काँग्रेसच्या 10 जागा आल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) 1 जागेवर आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजी नगरची आकडेवारी

भाजप : 10

शिवसेना : 08

शिवसेना UBT : 04

एमआयएम : 07

काँग्रेस : 01

राष्ट्रवादी दादा: 02

राष्ट्रवादी SP: 00

चंद्रपूरची आकडेवारी

भाजप – 8

शिवसेना – 2

राष्ट्रवादी – 1

काँग्रेस – 9

शिवसेना उद्धव – 4

राष्ट्रवादी शरद पवार –

मनसे –

वंचित – 2

एमआयएम – 2

अपक्ष – 4

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.