AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘छावा’च्या विरोधात जितकं बोलाल तितकंच…, सिनेमाचा विरोध करणाऱ्यांना ॲक्शन दिग्दर्शकाने चांगलंच सुनावलं

Chhaava: 'तेव्हाही आपलेच विरोधक होते आणि आता तर...', 'छावा' सिनेमाचा विरोध करणाऱ्यांना ॲक्शन दिग्दर्शकाचं ॲक्शन दिग्दर्शकाने चांगलंच सुनावलं. म्हणाले, 'सिनेमाच्या विरोधात जितकं बोलाल तितकंच...

'छावा'च्या विरोधात जितकं बोलाल तितकंच..., सिनेमाचा विरोध करणाऱ्यांना ॲक्शन दिग्दर्शकाने चांगलंच सुनावलं
| Updated on: Feb 26, 2025 | 9:04 AM
Share

Chhaava: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने अनेक नवे विक्रम रचले आहेत. बॉक्स ऑफिस देखील ‘छावा’ सिनेमाच्या पुढे नतमस्तक झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेल्या ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे सिनेमाला विरोध करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. आता सिनेमाला विरोध करणाऱ्यांना ॲक्शन दिग्दर्शकाने चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी या सिनेमाचा बचाव केला असून सिनेमाच्या हितासाठी स्वतःचं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले ॲक्शन दिग्दर्शक?

‘छावा’ सिनेमाला विरोध करणाऱ्यांबद्दल सिनेमाने ॲक्शन दिग्दर्शक परवेज शेख म्हणाले ‘जर तुम्ही छावा सिनेमा पाहिला असेल तर, सिनेमात प्रत्येक जण छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत होते. पण काही लोक त्यांच्या विरोधात होते. ज्यामुळे महाराज शत्रूच्या तावडीत सापडले. तर काही लोक याठिकाणी देखील आहेत, महाराष्ट्र आणि भारतात…’

‘तेव्हाही आपलेच विरोधत होते आणि काही लोक अजूनही आहेत. हे लोक जितकं विरोधात बोलतील, तितकाच सिनेमा हिट होईल. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात खूप काही घडलं होते, त्यामुळेच ते इतके मोठे महाराज झाले.’ असं शेख म्हणाले.

सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील परवेज शेख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सिनेमा जेव्हा तयार होत होता, तेव्हा मी सांगितलं होतं की सिनेमा हीट होईल. शुटिंगच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक लहान – मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन सिनेमा बनवण्यात आला. कारण आम्हाला माहीत होतं की, एका छोट्याशा चुकीनेही मोठा गोंधळ होऊ शकतो.’

विकी कौशलचं केलं कौतुक

परवेज शेख म्हणाले, ‘जर ॲक्शन दिग्दर्शक बाहेरील देशातील असता तर इतकी चांगली कमागिरी करूच शकला नसता. जी मी केली आहे. कारण माझं शिक्षण मुंबईत झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लहानपणापासून वाचत आहे…’

‘लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली कारण त्यांनी सिनेमासाठी त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं जेणेकरून सर्जनशील कोन समोर येऊ शकतील. विकी कौशलनेही उत्तम अभिनय केला आहे.’ असं देखील परवेज शेख म्हणाले.

Follow Us
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.