AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानसोबत असलेले ऐश्वर्याचे प्रेमसंबंध, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आईने सोडलं मौन

Aishwarya Rai Bachchan - Salman Khan: एकेकाळी सलमान आणि ऐश्वर्या यांचं एकमेकांवर होतं जीवापाड प्रेम... दोघांच्या नात्यावर अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आईने सोडलं मौन

सलमान खानसोबत असलेले ऐश्वर्याचे प्रेमसंबंध, अनेक वर्षांनंतर अभिनेत्रीच्या आईने सोडलं मौन
फाईल फोटो
| Updated on: Jul 09, 2025 | 12:03 PM
Share

Aishwarya Rai Bachchan – Salman Khan: अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री सलमान खान ब्रेकअपनंतर दोघे त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहे. पण आजही दोघांच्या नात्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगलेली असते. ‘हम दिल जे चुके सनम’ सिनेमातून दोघे चाहत्यांच्या पहिल्यांदा भेटीला आले आणि त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सिनेमानंतरच दोघांमध्ये प्रेम बहरलं. दरम्यान, सिनेमात ऐश्वर्या हिच्या आईची भूमिका साकारणाऱ्या स्मिता जयकर यांनी दोघांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं… असं वक्तव्य ऐश्वर्याची ऑनस्क्रिन आई स्मिता जयकर यांनी केलं आहे.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची केमिस्ट्री फक्त ‘हम दिल दे चुके’ सनम सिनेमापर्यंत मर्यादित नव्हती याचा अंदाज चाहत्यांना देखील आला होता. सिनेमात दोघांवर चित्रित केलेले असे अनेक सीन आहेत जे आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अभिनेत्री स्मिता जयकर दोघांच्या नात्याबद्दल म्हणाल्या, ‘सिनेमाच्या सेटवरच दोघांमध्ये प्रेम बहरलं. त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं. ज्यामुळे सिनेमासाठी देखील मोठी मदत झाली. सिनेमातील दोघांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.’ सांगायचं झालं तर, सिनेमाला 26 वर्ष पूर्ण झाली आहेत.

संजय लिला भन्साळी यांनी देखील स्वीकारलेलं दोघांचं प्रेम

18 जून 2025 रोजी सिनेमाला 26 वर्ष पूर्ण झाली आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांनीही सलमान आणि ऐश्वर्या यांच्यातील दीर्घकाळ चाललेल्या प्रेमाबद्दल भाष्य केलं. मुलाखतीत, भन्साळी यांनी पुष्टी केली की दोघांमध्ये खरोखरच प्रेम फुलत होतं आणि या केमिस्ट्रीने शूटला आणखी जादुई बनवलं होतं.

सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ऐश्वर्याच्या आधी सलमान खान अभिनेत्री सोमी अली हिला डेट करत होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सोमी हिने देखील सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केलं. दरम्यान, ऐश्वर्याची आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर सलमान खान याने सोमीसोबत ब्रेकअप केलं.

पण सलमान खान आणि ऐश्वर्या यांचे देखील प्रेमसंबंध फार काळ टिकले नाहीत. ऐश्वर्याने सलमान याच्यावर शारीरिक आणि मानसिक आरोप केले. जवळपास 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अनेक सलमान खान याने सर्वांसमोर ऐश्वर्यासाठी असलेलं प्रेम देखील व्यक्त केलं आहे. आज दोघे त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.

Follow Us
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्
सरकारचाच आधी एन्काऊंटर झाला पाहिजे, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्.
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर
महाराष्ट्राच्या तिजोरीला 32 हजार कोटींची 'गळती', धक्कादायक अहवाल समोर.
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.