शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सिनेकालाकारांचा पाठिंबा, रितेश देशमुख, सोनम कपूरसह अनेक कलाकार मैदानात

पंजाबी कलाकारांपाठोपाठ आता बॉलिवूड कलाकारही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत (Bollywood Actors support Farmers protest).

शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सिनेकालाकारांचा पाठिंबा, रितेश देशमुख, सोनम कपूरसह अनेक कलाकार मैदानात
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 3:22 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला 26 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली होती. तेव्हापासून हे आंदोलन सुरुच आहे. या आंदोलना दरम्यान केंद्र सरकारसोबत शेतकऱ्यांची पाच वेळा बैठक झाली. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनाला अनेक पंजाबी कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. त्यापाठोपाठ आता बॉलिवूड कलाकारही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत (Bollywood Actors support Farmers protest).

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री सोनम कपूर, दिग्दर्शक हंसला मेहता सारखे अनेक सिनेकलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे. सोनम कपूरचा पती उद्योगपती आनंद आहुजा यांनीदेखील शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं आहे.

“आज जर तुम्ही काही जेवण करत आहात, तर शेतकऱ्यांना धन्यवाद म्हणा. मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे”, असं रितेश देशमुख ट्विटरवर म्हणाला आहे (Bollywood Actors support Farmers protest).

सोनम कपूरने शेतकरी आंदोलनाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच तिने लेखक डेनियल वेबस्टरचं एक वाक्य शेअर केलं आहे. “जेव्हा शेती सुरू होते तेव्हा इतर कला अनुसरल्या जातात. त्यामुळे शेतकरी मानवी संस्कृतीचे संस्थापक आहेत”, असं सोनम म्हणाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

सोनमचा पती आनंद आहुजाने देखील शेतकरी आंदोलनाचा फोटो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by anand s ahuja (@anandahuja)

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल यांनी देखील ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. मी शेतकरी आणि केंद्र सरकारसोबत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दिग्दर्शक हंसन मेहता यांनी ट्विटरवर शेतकऱ्यांसोबत उभा आहे, असं म्हटलं आहे.

दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर “जो बोले सो निकाल”, असं म्हटलं आहे.

संबंधित बातमी :

‘दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक : रघुनाथदादा पाटील

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.