AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक; हानिया आमिर, माहिरा खान यांचे अकाऊंट्स बंद

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. आता भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक केला आहे. हानिया आमिर, माहिरा खान यांसारख्या लोकप्रिय पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात बंद करण्यात आले आहेत.

भारताकडून पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक; हानिया आमिर, माहिरा खान यांचे अकाऊंट्स बंद
Hania Amir and Mahira KhanImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2025 | 8:26 AM
Share

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट्स बुधवारी संध्याकाळी भारतात ब्लॉक करण्यात आले आहेत. हानिया आमिर, माहिरा खान, अली जफर यांसह इतरही काही पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट्स आता भारतात युजर्सना दिसणार नाहीत. 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममधील बैसरन पठारावर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 26 जणांनी आपले प्राण गमावले होते. पाकिस्तानातून सुरू असलेल्या सीमापार दहशतवादामुळे हा हल्ला झाल्याचं भारत सरकारने म्हटलंय. त्यानंतर भारताने चिथावणीखोर आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील कंटेट पसरवल्याच्या आरोपाखाली 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनल्सवर बंदी घातली होती. आता पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही निर्बंध लागू झाले आहेत.

इन्स्टाग्राम अकाऊंट ब्लॉक केलेल्या पाकिस्तानी कलाकारांपैकी हानिया आमिरचा भारतात खूप मोठा चाहतावर्ग आहे. ‘मेरे हमसफर’, ‘कभी मैं कभी तुम’ यांसारख्या मालिकांमधून तिला लोकप्रिया मिळाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हानियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित निषेध व्यक्त केला होता. ‘कुठेही घडणारी दुर्घटना ही सर्वांसाठी एक दुर्दैवी घटना असते. अलिकडेच घडलेल्या घटनांमध्ये ज्या निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले, त्यांच्यासाठी माझ्या मनात संवेदना आहेत. दु:खाची भाषा एकच असते. आपण नेहमीच माणुसकीची निवड करुया’, असं तिने लिहिलं होतं.

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानने 2017 मध्ये अभिनेता शाहरुख खानच्या ‘रईस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. गायक आणि अभिनेता अली जफरलाही निर्बंधांचा मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे फवाद खान आणि आतिफ अस्लम यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट अजूनही भारतात सुरू आहेत. फवाद त्याच्या आगामी ‘अबीर गुलाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होता. परंतु दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. 2016 च्या उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली. अनेक युट्यूबर्सचे चॅनल्सही भारतात बंद करण्यात आले आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित करण्याची घोषणा केली. त्याचसोबत अटारी-वाघा बॉर्डर बंद केली, पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी केले. याविरोधात इस्लामाबादने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपलं हवाई क्षेत्र बंद करून आणि तिसऱ्या देशांद्वारे होणाऱ्या अप्रत्यक्ष व्यापारासह सर्व व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने भारताच्या पाणीवाटप कराराच्या स्थगितीलाही नकार दिला आहे. पाण्याच्या प्रवाहात कोणताही अडथळा आणणं हे युद्धाचं कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.